महत्वाचे विभाग

Visit Here

Pages

Saturday, November 28, 2020

केंद्रीय शिक्षण विभागाचे स्कूल बॅग धोरण जाहीर



बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकार याविषयी संशोधन करत होते.
बरेच शिक्षणतज्ञ यांचे मतानुसार व वैद्यकीय तज्ञ यांच्या माध्यमातून संशोधन सुरू होते.



बरेच दिवसापासून पासून विद्यार्थ्यांच्या पाठदुखीच्या आणि दप्तराच्या ओझ्यासंबंधी  चर्चेअंती आज केंद्रीय शिक्षण विभागाने स्कूल बॅग धोरण जाहीर केले आहे.
 या स्कूल धरून च्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षण पासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे किमान व

जन  किती असावे? यासंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना या धोरणामध्ये जाहीर केल्या आहेत.
 त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या धोरणातील महत्वाच्या बाबी 




👉 विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10 % एवढेच त्याच्या दप्तराचे ओझे असावे.

👉पूर्वप्राथमिक विद्यार्थ्याचे सरासरी वजन 10 ते 16  असते म्हणून त्यांना दप्तराचे ओझे नसावे.


👉 प्राथमिक म्हणजेच पहिली ते दुसरी विद्यार्थ्याचे सरासरी वजन   16 ते 22 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे १.६ किलो ते 2.2 किलो असावे.

👉 तिसरी ते पाचवी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 15 ते 25 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 1.5 ते  2.5   असावे.


👉   विद्यार्थ्याचे म्हणजेच सहावी व सातवी  विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 20 ते 30  असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 2 ते 3 किलो असावे.


👉 माध्यमिक शाळा आठवीच्या विद्यार्थ्याचे सरासरी वजन 25 ते 40  असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे  2.5 ते 4 किलो  असावे.

👉 माध्यमिक शाळा नववी व दहावी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 25 ते 45 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 2.5 ते 4.5 किलोअसावे.

👉 उच्च माध्यमिक शाळा अकरावी व बारावी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 35 ते 40 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 3.5 ते 4 किलो असावे.

खालील लिंक ला टच करून

शैक्षणिक विडियोकरिता आमच्या. YouTube  चॅनल ला भेट द्या आणि subscribe करा
 आपला शिक्षक मित्र रियाज आतार