महत्वाचे विभाग

Visit Here

Pages

Monday, August 31, 2020

प्रवासासाठी असणारी ई - पास ची अट अखेर रद्द

     

  

खूप दिवसापासून कोरोनाच्या  वैश्विक आपत्तीमुळे सुरू असलेली ई- पास ची अट राज्यसरकारने रद्द केली असून आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे सोईस्कर झाले आहेत.
मात्र अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा अन्यथा प्रवास करणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Unlock 4 ची प्रक्रिया सुरू असली तरी कोरोनाचा प्रभाव आणि प्रसार होतच आहे. तरी सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे.
      शासनाने बऱ्याचशा बाबतीत सवलत दिली असली तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कोरोना घालवण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

        लोक आणि वस्तूंच्या प्रवासासाठी, राज्यात किंवा आंतरराज्यसाठी स्वतंत्र परवानगी किंवा ई-पास आवश्यक नसण्याची शक्यता आहे. 

काय बंद राहणार?
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाईन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे.
  • सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत.
  • एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी.
  • मेट्रो सेवा बंदच राहणार आहे.
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत.
काय सुरु राहणार...
  • सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत.
  • हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
  • खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे,
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही.
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
  • टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

No comments:

Post a Comment

thank for ur valuable comment