WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Thursday, July 10, 2025

शालेय परिपाठ दिनांक 11/07/2025

 *11/07/25 शुक्रवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂



 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*



▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

 🍥 *11. जुलै:: शुक्रवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

 आषाढ कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~वैधृति, करण ~बालव, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

11. *मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *कोल्हा काकडीला राजी –* 

  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *गतस्य शोचनं नास्ति ।*

     ⭐अर्थ ::~ भूतकाळातील

   गोष्टींविषयी चिंता करू नये.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 11. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

*★जागतिक लोकसंख्या दिन*

★हा या वर्षातील १९२ वा (लीप वर्षातील १९३ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९४ : दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९७९ : अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

●१९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.

●१६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५३ : सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री

◆१९२१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू 

◆१८९१ : परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. 

◆१८८९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००९ : शांताराम नांदगावकर – गीतकार 

●२००३ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक 

●१९९४ : रामराव राघोबा राणे

 मेजर (निवृत्त)-- रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे, हा सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*

       ●●●●●००००००●●●●●

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे


नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे


सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे 


जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे


सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *❂ भारत अमुचा देश ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

 भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक


आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी

प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी

दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ


धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू

उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू

विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख


प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला

मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला

सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *❃❝ निर्मळता ❞❃*

     ━━═•●◆●★★●◆●•═━━

  एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरुसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरुकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरुसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत विचाराने निर्णय घ्यावे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *जेंव्हा वेळ आपल्या साठी*

*थांबत नाही मग आपण*

      *योग्य वेळेची वाट का* 

*पाहत बसायचे ?*

     *प्रत्येक क्षण हा योग्यच*

*असतो चुकतो तो फक्त* 

      *आपला निर्णय*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪ भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे ?

 ➜मीश्र अर्थव्यवस्था.


✪ गुगल हे काय आहे ?

 ➜सर्च इंजिन.


 ✪ कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ?

 ➜सिंहगड.


✪ रिजर्व बॅंकेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

 ➜१जानेवारी १९४९ 


 ✪ बिल गेट्स यांच्या कंपनीचे नाव काय आहे ?

 ➜ मायक्रोसाॅफ्ट 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ महत्वपूर्ण दिवस ❂* 

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


*11. ❒जागतिक लोकसंख्या दिन❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   १९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात ११ जुलै १९८७ रोजी ती बरोबर दुप्पट म्हणजे ५ अब्ज झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.


    झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. त्याविषयी..

 

     जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ असे या दिनाचे घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.

 

    आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची  धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

    1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

★ लोकसंखवाढ चिंताजनक ★

    देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 140 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारताला मागे मागे टाकले आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

       

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शुक्रवार~11/07/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*

Wednesday, July 9, 2025

शालेय परिपाठ दिनांक 10/07/2025

 *10/07/25 गुरूवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂



 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *10. जुलै:: गुरूवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

आषाढ पोर्णिमा, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~पूर्णिमा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~इन्द्र, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


10. *चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10. *नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे*

      ★ अर्थ ::~ सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे. अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *विद्याविहीनः पशुः ।*

   ⭐अर्थ ::~ विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 10. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★मातृसुरक्षा दिन

★हा या वर्षातील १९१ वा (लीप वर्षातील १९२ वा) दिवस आहे.

★बहामाचा स्वातंत्र्यदिन


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण

●१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण

●१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

●१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका

◆१९४९ : *सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर* – क्रिकेटपटू व समालोचक

◆१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद

◆१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री 

◆१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक 

●१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष 

●१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक 

●१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✸ मेरे देश की धरती.. ✸*

     ●●●●●००००००●●●●●

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं 

ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं 

सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे 

आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती


जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है 

क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है 

इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा

यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ 

गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ 

रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से 

रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *❂ ज्यास देव सापडला ❂*

      ✶✶✹✹★●★✹✹✶✶

ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी

त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही


करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश

त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश

धूप वसंताचा तेथे दरवळून येई


दु:ख पाहुनी दुसर्‍याचे ज्याचे भरतात डोळे

डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले

अशा माणसाचा स्पर्श, पांडुरंग होई


धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव

अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव

असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10. *❝ दैवी संपत्ती ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━

     एक म्हातारं जोडप होतं.घराजवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते.एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं.त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती.उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.

ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो.आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.


    हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस.ही जागा आपल्या मालकीची नाही.तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ? 


     म्हातारा म्हणाला.आपण ही अशीच इथे ठेवू देऊया.जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.


     पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले.म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली.पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय.त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला.त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली.पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला.तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की,म्हातारीने आपल्याला फसवण्यासाठीच हा डाव टाकला आहे.तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.


      सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला.ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता.आता मात्र दोघांची खात्री पटली की,देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच* आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *आज सकाळी धुक्याने*

   *एक छान गोष्ट शिकवली की*

*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,

*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪ विमानाचा शोध कोणी लावला ?

 ➜राईट बंधू.


 ✪ गंगा नदीला बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?

 ➜ पद्मा.


 ✪ 'हाॅपमॅन कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 ➜टेनिस.


 ✪ शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?

 ➜२४ कॅरेट.


 ✪ जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?

 ➜ नोबेल पुरस्कार 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

"गुरुपूर्णिमा"


     भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अत्यंत उच्च स्थान आहे. गुरू म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य मानली गेली आहे. याच गुरूंच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या उपकारांची आठवण ठेवून दरवर्षी आषाढ पौर्णिमेला ‘गुरु पौर्णिमा’ साजरी केली जाते. हा दिवस गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. गुरुशिष्य परंपरेचे हे प्रतीक असलेले हे पर्व प्रत्येक विद्यार्थ्याला आणि आध्यात्मिक साधकाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

गुरु पौर्णिमा हा दिवस केवळ सण नसून, तो एक  "आध्यात्मिक साधनेचा दिवस" आहे. अनेक साधक या दिवशी व्रत, उपवास, ध्यान आणि जप करून आपल्या गुरूच्या चरणी सेवा अर्पण करतात. याला आत्मशुद्धी, मनशांती व ईश्वरी कृपेचा दिवस मानले जाते.

गुरू हे आपल्या कर्म, मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करतात. त्यामुळे गुरूशिवाय अध्यात्माची वाटचाल अपूर्ण मानली जाते.

      गुरु पूर्णिमा ही हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची एक अत्यंत महत्त्वाची सण/पर्व दिन आहे, जी गुरुंच्या  सन्मानार्थ साजरी केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असते.


🌟 गुरु पूर्णिमेचे महत्त्व:- 

★धार्मिक महत्त्व:~

•हिंदू धर्मात:- या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांनी वेदांचे विभागीकरण आणि महाभारताचे लेखन केले. म्हणून या दिवसाला व्यास पूर्णिमा असेही म्हणतात.


•बौद्ध धर्मात:- भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना सारनाथ येथे या दिवशीच प्रथम धर्मोपदेश दिला होता. त्यामुळे बौद्ध धर्मातही हा दिवस विशेष मानला जातो.


•जैन धर्मात:- भगवान  महावीरांचे प्रथम शिष्य इंद्रभूती गौतम यांनी या दिवशी दीक्षा घेतली, म्हणून हे ही दिवस महत्त्वाचा मानला जातो.


★ आध्यात्मिक महत्त्व:~

   गुरू म्हणजे अज्ञान अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा. या दिवशी लोक आपल्या आध्यात्मिक गुरूंना वंदन करतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आभार मानतात.


★ शैक्षणिक महत्त्व:~

भारतीय शिक्षणपद्धतीत गुरू-शिष्य परंपरेला फार मोठे स्थान आहे. पारंपरिक शाळा (गुरुकुल) मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा सत्कार करून ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.


★गुरु पूर्णिमेचा संदेश:~

"गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।

गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥"


हा श्लोक गुरूचा महिमा सांगतो. गुरू म्हणजे ज्ञानाचा स्रोत, जो आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतो.

हवं असल्यास मी गुरु पूर्णिमा साठी खास शुभेच्छा संदेश, कविता किंवा भाषणही तयार करून देऊ शकतो. सांगितलं तरी चालेल.


★गुरू म्हणजे कोण?

     "गु" म्हणजे अंधार आणि "रू" म्हणजे प्रकाश. गुरू म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. गुरू हा केवळ शिक्षक नसतो, तर तो एक मार्गदर्शक, संस्कारकर्ता, आणि जीवनाचे खरे दिशादर्शक असतो. गुरू आपल्या शिष्याला बाह्य जगाच्या ज्ञानासह अंतर्मनाचेही ज्ञान देतो. गुरूच शिष्याला आत्मोन्नती आणि मुक्तीकडे घेऊन जातो.


"गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥

    या श्लोकातून गुरूचे स्थान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांइतकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁गुरूवार ~10/07/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ ⋑⋐⋑⛯⋐⋑*

Thursday, July 3, 2025

सामान्य ज्ञान प्रश्नावली क्रमांक 1

 

🔲🔲🌈🌱🌱🌈🔲🔲

*🔴सामान्यज्ञान प्रश्नावली🔴*


*(१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- कोय

-----------------------------

*(२) फणसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- आठळी

-----------------------------

*(३) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- चिंचोका

-----------------------------

*(४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- सरकी 

-----------------------------

*(५) आपल्या देशाचे नाव काय आहे ?*

उत्तर -- भारत

-----------------------------

*(६) आपल्या राज्याचे नाव काय आहे ?*

उत्तर -- महाराष्ट्र

-----------------------------

*(७) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?*

उत्तर -- पूर्व

-----------------------------

*(८) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?*

उत्तर -- पश्चिम

-----------------------------

*(९) मोराचा तुरा कोठे असतो ?*

उत्तर -- डोक्यावर

-----------------------------

*(१०) कोणता पक्षी झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो ?*

उत्तर -- सुतारपक्षी

-----------------------------

*(११) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?*

उत्तर -- सिंह 

-----------------------------

*(१२) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?*

उत्तर -- उंट 

-----------------------------

*(१३) मोटारसायकला किती चाके असतात ?*

उत्तर -- दोन

-----------------------------

*(१४) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?*

उत्तर -- सात

------------------------------------

*(१५) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(१६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- सिंह

---------------------------

*(१६) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

----------------------------

*(१७) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?*

उत्तर -- सोंड

--------------------------------

*(१८) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(१९) कोळी या किड्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- आठ 

-------------------------------

*(२०) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कोळी

-------------------------------

*(२१) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कुत्रा 

-------------------------------

*(२२) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- वटवाघूळ

-------------------------------

*(२३) झुरळाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२४) मुख्य ऋतू किती ?*

उत्तर -- तीन 

------------------------------

*(२५) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

-------------------------------

*(२६) बेडकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

------------------------------

*(२७) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२८) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

---------------------------------

*(२९ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(३०) सापाला किती पाय असतात ?*

उत्तर -- पाय नसतात.

-------------------------------

*(३१) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(३२) माशाला किती पाय अस्तात ?*

उत्तर -- पाय नसतात.

--------------------------------

*(३३) आंबा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

--------------------------------

*(३४) पेरू या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

--------------------------------

*(३५)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

-------------------------------

*(३६) सिताफळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

------------------------------

*(३७) आवळा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

---------------------------------

*(३८) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(३९) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

------------------------------

*(४०) एका दिवसाचे किती तास असतात ?*

उत्तर -- २४ तास

---------------------------------

*(४१) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*

उत्तर -- वासरू

-------------------------------

*(४२) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?*

उत्तर -- पिवळा


Tuesday, July 1, 2025

मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद कोसारी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

 


मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आज शाळेमध्ये शालेय बॅग,पाणी बाटली, वह्या,पेन यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था अध्यक्ष मा. तानाजी व्हनमाने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवव्याख्याते प्रतीक पाटील,अमन संधे,भारुडकर विजय टेंगले,पत्रकार अर्जुन हजारे,पत्रकार अभिजीत साळुंखे, शेतकरी न्यूज चॅनल संपादक अरुण पाटील, राहुल सरक,तेजस व्हनमाने, प्रसाद कोळी, सागर व्हनमाने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने शैक्षणिक साहित्य मिळावे याकरता श्री उत्तम महारनूर लोकप्रिय नेते यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच कविताताई टेंगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खडतरे, रासप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव टेंगले, रासप जत तालुकाध्यक्ष संभाजी टेंगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास महारनुर, उपाध्यक्ष कुलदीप खडतरे, उपस्थित होते. गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.