WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Thursday, July 10, 2025

शालेय परिपाठ दिनांक 11/07/2025

 *11/07/25 शुक्रवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂



 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*



▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

 🍥 *11. जुलै:: शुक्रवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

 आषाढ कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~वैधृति, करण ~बालव, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

11. *मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *कोल्हा काकडीला राजी –* 

  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *गतस्य शोचनं नास्ति ।*

     ⭐अर्थ ::~ भूतकाळातील

   गोष्टींविषयी चिंता करू नये.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 11. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

*★जागतिक लोकसंख्या दिन*

★हा या वर्षातील १९२ वा (लीप वर्षातील १९३ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९४ : दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९७९ : अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

●१९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.

●१६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५३ : सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री

◆१९२१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू 

◆१८९१ : परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. 

◆१८८९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००९ : शांताराम नांदगावकर – गीतकार 

●२००३ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक 

●१९९४ : रामराव राघोबा राणे

 मेजर (निवृत्त)-- रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे, हा सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*

       ●●●●●००००००●●●●●

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे


नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे


सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे 


जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे


सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *❂ भारत अमुचा देश ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

 भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक


आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी

प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी

दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ


धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू

उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू

विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख


प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला

मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला

सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *❃❝ निर्मळता ❞❃*

     ━━═•●◆●★★●◆●•═━━

  एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरुसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरुकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरुसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत विचाराने निर्णय घ्यावे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *जेंव्हा वेळ आपल्या साठी*

*थांबत नाही मग आपण*

      *योग्य वेळेची वाट का* 

*पाहत बसायचे ?*

     *प्रत्येक क्षण हा योग्यच*

*असतो चुकतो तो फक्त* 

      *आपला निर्णय*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪ भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे ?

 ➜मीश्र अर्थव्यवस्था.


✪ गुगल हे काय आहे ?

 ➜सर्च इंजिन.


 ✪ कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ?

 ➜सिंहगड.


✪ रिजर्व बॅंकेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

 ➜१जानेवारी १९४९ 


 ✪ बिल गेट्स यांच्या कंपनीचे नाव काय आहे ?

 ➜ मायक्रोसाॅफ्ट 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ महत्वपूर्ण दिवस ❂* 

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


*11. ❒जागतिक लोकसंख्या दिन❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   १९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात ११ जुलै १९८७ रोजी ती बरोबर दुप्पट म्हणजे ५ अब्ज झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.


    झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. त्याविषयी..

 

     जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ असे या दिनाचे घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.

 

    आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची  धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

    1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

★ लोकसंखवाढ चिंताजनक ★

    देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 140 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारताला मागे मागे टाकले आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

       

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शुक्रवार~11/07/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*

Wednesday, July 9, 2025

शालेय परिपाठ दिनांक 10/07/2025

 *10/07/25 गुरूवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂



 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *10. जुलै:: गुरूवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

आषाढ पोर्णिमा, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~पूर्णिमा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~इन्द्र, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


10. *चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10. *नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे*

      ★ अर्थ ::~ सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे. अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *विद्याविहीनः पशुः ।*

   ⭐अर्थ ::~ विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 10. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★मातृसुरक्षा दिन

★हा या वर्षातील १९१ वा (लीप वर्षातील १९२ वा) दिवस आहे.

★बहामाचा स्वातंत्र्यदिन


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण

●१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण

●१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

●१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका

◆१९४९ : *सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर* – क्रिकेटपटू व समालोचक

◆१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद

◆१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री 

◆१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक 

●१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष 

●१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक 

●१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✸ मेरे देश की धरती.. ✸*

     ●●●●●००००००●●●●●

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं 

ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं 

सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे 

आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती


जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है 

क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है 

इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा

यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ 

गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ 

रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से 

रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *❂ ज्यास देव सापडला ❂*

      ✶✶✹✹★●★✹✹✶✶

ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी

त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही


करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश

त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश

धूप वसंताचा तेथे दरवळून येई


दु:ख पाहुनी दुसर्‍याचे ज्याचे भरतात डोळे

डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले

अशा माणसाचा स्पर्श, पांडुरंग होई


धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव

अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव

असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10. *❝ दैवी संपत्ती ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━

     एक म्हातारं जोडप होतं.घराजवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते.एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं.त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती.उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.

ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो.आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.


    हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस.ही जागा आपल्या मालकीची नाही.तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ? 


     म्हातारा म्हणाला.आपण ही अशीच इथे ठेवू देऊया.जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.


     पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले.म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली.पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय.त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला.त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली.पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला.तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की,म्हातारीने आपल्याला फसवण्यासाठीच हा डाव टाकला आहे.तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.


      सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला.ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता.आता मात्र दोघांची खात्री पटली की,देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच* आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *आज सकाळी धुक्याने*

   *एक छान गोष्ट शिकवली की*

*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,

*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪ विमानाचा शोध कोणी लावला ?

 ➜राईट बंधू.


 ✪ गंगा नदीला बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?

 ➜ पद्मा.


 ✪ 'हाॅपमॅन कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 ➜टेनिस.


 ✪ शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?

 ➜२४ कॅरेट.


 ✪ जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?

 ➜ नोबेल पुरस्कार 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

"गुरुपूर्णिमा"


     भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अत्यंत उच्च स्थान आहे. गुरू म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य मानली गेली आहे. याच गुरूंच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या उपकारांची आठवण ठेवून दरवर्षी आषाढ पौर्णिमेला ‘गुरु पौर्णिमा’ साजरी केली जाते. हा दिवस गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. गुरुशिष्य परंपरेचे हे प्रतीक असलेले हे पर्व प्रत्येक विद्यार्थ्याला आणि आध्यात्मिक साधकाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

गुरु पौर्णिमा हा दिवस केवळ सण नसून, तो एक  "आध्यात्मिक साधनेचा दिवस" आहे. अनेक साधक या दिवशी व्रत, उपवास, ध्यान आणि जप करून आपल्या गुरूच्या चरणी सेवा अर्पण करतात. याला आत्मशुद्धी, मनशांती व ईश्वरी कृपेचा दिवस मानले जाते.

गुरू हे आपल्या कर्म, मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करतात. त्यामुळे गुरूशिवाय अध्यात्माची वाटचाल अपूर्ण मानली जाते.

      गुरु पूर्णिमा ही हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची एक अत्यंत महत्त्वाची सण/पर्व दिन आहे, जी गुरुंच्या  सन्मानार्थ साजरी केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असते.


🌟 गुरु पूर्णिमेचे महत्त्व:- 

★धार्मिक महत्त्व:~

•हिंदू धर्मात:- या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांनी वेदांचे विभागीकरण आणि महाभारताचे लेखन केले. म्हणून या दिवसाला व्यास पूर्णिमा असेही म्हणतात.


•बौद्ध धर्मात:- भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना सारनाथ येथे या दिवशीच प्रथम धर्मोपदेश दिला होता. त्यामुळे बौद्ध धर्मातही हा दिवस विशेष मानला जातो.


•जैन धर्मात:- भगवान  महावीरांचे प्रथम शिष्य इंद्रभूती गौतम यांनी या दिवशी दीक्षा घेतली, म्हणून हे ही दिवस महत्त्वाचा मानला जातो.


★ आध्यात्मिक महत्त्व:~

   गुरू म्हणजे अज्ञान अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा. या दिवशी लोक आपल्या आध्यात्मिक गुरूंना वंदन करतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आभार मानतात.


★ शैक्षणिक महत्त्व:~

भारतीय शिक्षणपद्धतीत गुरू-शिष्य परंपरेला फार मोठे स्थान आहे. पारंपरिक शाळा (गुरुकुल) मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा सत्कार करून ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.


★गुरु पूर्णिमेचा संदेश:~

"गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।

गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥"


हा श्लोक गुरूचा महिमा सांगतो. गुरू म्हणजे ज्ञानाचा स्रोत, जो आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतो.

हवं असल्यास मी गुरु पूर्णिमा साठी खास शुभेच्छा संदेश, कविता किंवा भाषणही तयार करून देऊ शकतो. सांगितलं तरी चालेल.


★गुरू म्हणजे कोण?

     "गु" म्हणजे अंधार आणि "रू" म्हणजे प्रकाश. गुरू म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. गुरू हा केवळ शिक्षक नसतो, तर तो एक मार्गदर्शक, संस्कारकर्ता, आणि जीवनाचे खरे दिशादर्शक असतो. गुरू आपल्या शिष्याला बाह्य जगाच्या ज्ञानासह अंतर्मनाचेही ज्ञान देतो. गुरूच शिष्याला आत्मोन्नती आणि मुक्तीकडे घेऊन जातो.


"गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥

    या श्लोकातून गुरूचे स्थान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांइतकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁गुरूवार ~10/07/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ ⋑⋐⋑⛯⋐⋑*

Thursday, July 3, 2025

सामान्य ज्ञान प्रश्नावली क्रमांक 1

 

🔲🔲🌈🌱🌱🌈🔲🔲

*🔴सामान्यज्ञान प्रश्नावली🔴*


*(१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- कोय

-----------------------------

*(२) फणसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- आठळी

-----------------------------

*(३) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- चिंचोका

-----------------------------

*(४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- सरकी 

-----------------------------

*(५) आपल्या देशाचे नाव काय आहे ?*

उत्तर -- भारत

-----------------------------

*(६) आपल्या राज्याचे नाव काय आहे ?*

उत्तर -- महाराष्ट्र

-----------------------------

*(७) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?*

उत्तर -- पूर्व

-----------------------------

*(८) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?*

उत्तर -- पश्चिम

-----------------------------

*(९) मोराचा तुरा कोठे असतो ?*

उत्तर -- डोक्यावर

-----------------------------

*(१०) कोणता पक्षी झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो ?*

उत्तर -- सुतारपक्षी

-----------------------------

*(११) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?*

उत्तर -- सिंह 

-----------------------------

*(१२) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?*

उत्तर -- उंट 

-----------------------------

*(१३) मोटारसायकला किती चाके असतात ?*

उत्तर -- दोन

-----------------------------

*(१४) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?*

उत्तर -- सात

------------------------------------

*(१५) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(१६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- सिंह

---------------------------

*(१६) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

----------------------------

*(१७) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?*

उत्तर -- सोंड

--------------------------------

*(१८) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(१९) कोळी या किड्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- आठ 

-------------------------------

*(२०) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कोळी

-------------------------------

*(२१) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कुत्रा 

-------------------------------

*(२२) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- वटवाघूळ

-------------------------------

*(२३) झुरळाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२४) मुख्य ऋतू किती ?*

उत्तर -- तीन 

------------------------------

*(२५) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

-------------------------------

*(२६) बेडकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

------------------------------

*(२७) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२८) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

---------------------------------

*(२९ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(३०) सापाला किती पाय असतात ?*

उत्तर -- पाय नसतात.

-------------------------------

*(३१) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(३२) माशाला किती पाय अस्तात ?*

उत्तर -- पाय नसतात.

--------------------------------

*(३३) आंबा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

--------------------------------

*(३४) पेरू या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

--------------------------------

*(३५)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

-------------------------------

*(३६) सिताफळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

------------------------------

*(३७) आवळा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

---------------------------------

*(३८) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(३९) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

------------------------------

*(४०) एका दिवसाचे किती तास असतात ?*

उत्तर -- २४ तास

---------------------------------

*(४१) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*

उत्तर -- वासरू

-------------------------------

*(४२) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?*

उत्तर -- पिवळा


Tuesday, July 1, 2025

मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद कोसारी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

 


मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आज शाळेमध्ये शालेय बॅग,पाणी बाटली, वह्या,पेन यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था अध्यक्ष मा. तानाजी व्हनमाने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवव्याख्याते प्रतीक पाटील,अमन संधे,भारुडकर विजय टेंगले,पत्रकार अर्जुन हजारे,पत्रकार अभिजीत साळुंखे, शेतकरी न्यूज चॅनल संपादक अरुण पाटील, राहुल सरक,तेजस व्हनमाने, प्रसाद कोळी, सागर व्हनमाने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने शैक्षणिक साहित्य मिळावे याकरता श्री उत्तम महारनूर लोकप्रिय नेते यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच कविताताई टेंगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खडतरे, रासप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव टेंगले, रासप जत तालुकाध्यक्ष संभाजी टेंगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास महारनुर, उपाध्यक्ष कुलदीप खडतरे, उपस्थित होते. गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.



Monday, June 30, 2025

सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २

 सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २


 


प्रश्न १ - संत गोरोबा यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - तेरेढोकी ( त्रयदशा - धाराशिव )




प्रश्न २ - संत कान्होपात्रा यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - मंगळवेढा 




प्रश्न ३ - संत सेना महाराज यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - बांधवगड 




प्रश्न ४ - संत चोखामेळा यांचा जन्म कुठे झाला ? 

उत्तर - मेहुणराजा 




प्रश्न ५ - संत साईबाबा यांचा जन्म कुठे झाला ?


उत्तर - पाथरी

Saturday, April 5, 2025

रियाज आतार सर शिक्षण विभाग जत यांचे कडून सन्मानित

 रियाज आतार सर शिक्षण विभाग जत यांचे कडून सन्मानित 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक कोसारी शाळेतील आदर्श शिक्षक रियाज रजाक आतार यांनी तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविल्याने जत चे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडोळकर ,गटविकास अधिकारी आनंदा लोकरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनसर शेख व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रमाणपञ, ट्राॅफी व दीड हजार रूपये बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी ही त्यांनी काम केलेल्या काराजनगी शाळेला सलग दोन वर्ष माझी मुख्यमंत्री सुंदर शाळेचा सन्मान मिळाला व पाच लाख रुपयांचे पारितोषक मिळाले या यशाबद्दल शाळेचे

 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास महारनुर, रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन टेंगले, ग्रामस्थ व सर्व शिक्षक स्टाफ यांचेकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला

Tuesday, October 3, 2023

welcome

शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा २०२३-२४ 


शिक्षकाचे नाव : रियाज रजाक आतार 


शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी


केंद्र शेगाव 

तालुका जत जिल्हा सांगली

 

Sunday, October 24, 2021

महत्वाचे जीआर व परिपत्रक

 *महत्वाचे जीआर व परिपत्रक*


*निव्या लिंकला टच करून पहा*

शैक्षणिक अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब, बेल प्रेस करा


https://youtu.be/3t_MYUc1lY0

☝️

*निष्ठा प्रशिक्षण वेळापत्रक 2021=22 वर्षासाठी*


https://youtu.be/hhdP5UZtKLc

☝️

*अनुकंपा नियुक्तीचे धोरण महत्वाचा शासन निर्णय 27 सप्टेंबर 2021*


https://youtu.be/tIyx0pMgzck


*राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पाठाटाचण काढण्याची आवश्यकता नाही 5 सप्टेंबर 2019 चे पत्र*


https://youtu.be/EKGskOuIPUo

☝️

*राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून 25 टक्के रक्कम कशासाठी काढता येतील सूचना 8 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/vgMSjD-cJ3w

☝️

*शालेय पोषण आहार नवीन वितरित बाबत 8 ऑक्टो 2021 संचालक पत्र*


https://youtu.be/mOBr5Iqs0h8

☝️

*पहिली ते दहावी वर्ग तासिका विभागणी व झालेला बदल 2021-22*


https://youtu.be/8ISa4Uve3v8

☝️

*राज्यातील शाळेतील मराठी व उर्दू माध्यम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिक्षक मार्गदर्शिका वितरीत करण्याबाबत 11-10-2021 चे पत्र*


https://youtu.be/6S4FweCb7lU

👆

*मोकळ्या जागेत पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याबाबत 11 ऑक्टोबर 2021चा शासन निर्णय*


https://youtu.be/KImqt7MLIJ8

☝️ पहा

*वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार आहार रक्कम 12 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/b4MmFD1uznA

☝️

*अकरावी प्रवेश याबाबत 18 ऑक्टोबर 2021 चे पत्र*


https://youtu.be/tBwINE_Rj0g

☝️

मुक्त विद्यापीठ प्रवेशाबाबत


https://youtu.be/-KBlEdSLd24

☝️

*राज्यातील 25 ते 29 ऑक्टोबर 2021 शिक्षकांची कार्यशाळा सोबत वेळापत्रक आहे*


https://youtu.be/QyrURYNJoXY

☝️

*टीईटी परीक्षा वेळापत्रकात बदल*


https://youtu.be/krBMRItdYKw

☝️

*शैक्षणिक शुल्क 2021-22 वर्षात 15 टक्के कपात करणे बाबत*


https://youtu.be/hKBMBVimpuE

☝️

*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2021-22 आयोजनाबाबत 21-10-2021 संचालक पत्र*


https://youtu.be/0txHauJKtK8

☝️

*शिक्षक व मुख्याध्यापक यांचे वरिष्ठ व निवड श्रेणी चे ट्रेनिंग ऑनलाईन होणार 22 ऑक्टोबर 2021 चा शासन निर्णय*


https://youtu.be/mXwHKBytFBk

👍

*शिक्षणात व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना सवलत बाबत*


https://youtu.be/14DA_ctDWck

☝️

*संस्था कनिष्ठ महाविद्यालय तासिका तत्वावर सुधारित दर 22 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/QuoSNKbRXtA

☝️

*पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार सूचना 20 ऑक्टोबर 2021 पत्र*


https://youtu.be/jlk40CuJCI8

👆

*मा. उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्याध्यापकांना शालेय रेकॉर्ड दुरुस्त करण्याचा अधिकार प्रदान करण्याबाबत*


https://youtu.be/BoozRxXEPDE

👆

*शिक्षक पवित्र पोर्टल भरती 2021 निवड प्रक्रिया बाबत शिक्षण संचालक पुणे पत्र 7 सप्टेंबर 2021*


https://youtu.be/wIbIKyyZn60

👆

*संचमान्यता कार्यरत पदाची माहिती दिली नाही तर ऑक्टोबर महिन्याचा मुख्याध्यापकाचे वेतन अदा केले जाणार नाही*


https://youtu.be/moxvUuQv30o

👆

*सेवा पुस्तिकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत 23 जुलै 2013*


https://youtu.be/Q-H3HFQTnVA

👆

*टॅक्स आयकर नवी नियम 2021-22*


https://youtu.be/2U2B18vluxo

👍

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन बाबत नागपूर उपसंचालक पत्र


https://youtu.be/obFjo3ORNx8

☝️

*जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र ची आवश्यकता नाही*


https://youtu.be/B7zLP1Jz7XI

☝️

*सत्र 2021-22- 10 वी साठी जलसुरक्षा विषय अनिवार्य*


https://youtu.be/vRqX_PBd-b8

*महाराष्ट्रातील सर्व मेडियम विद्यार्थ्यासाठी 21 सप्टेंबर 2021 पासून सह्याद्री वाहिनी टिलिमिली मालिका वेळापत्रक पहिली ते आठवी वर्ग*


https://youtu.be/G3BBL5-edJE

☝️

*शिक्षक पात्रता परीक्षा नवीन वेळापत्रक 2021-20 सप्टेंबर 2021 पत्र पुणे आयुक्त पत्र*


https://youtu.be/Yih4ktvCieI

☝️

 *शालेय स्पर्धा खेळ 2021-22 वयात बद्दल बाबत इंडियन फेडरेशन सचिव पत्र*


https://youtu.be/soOqhaJKP_w

☝️ 

*प्राथमिक माध्यमिक शाळेसाठी 20 टक्के अनुदान बाबत पत्र*


https://youtu.be/DacCTu0d_ZE

☝️

 *सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे कायम 21 सप्टेंबर 2021चे पत्र*


https://youtu.be/TQkFoPuMVwg

*महाराष्ट्रातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी निष्ठा प्रशिक्षण साठी नोंद करण्याबाबत पत्र*


https://youtu.be/G99i7G_mezY

☝️

*महाराष्ट्रातील शाळेत विद्यार्थ्याकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याबाबत 27 सप्टेंबर 2021 शासन निर्णय.*


https://youtu.be/YZ22IiAma6o

☝️

*शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतनचा पहिला व दुसरा हप्ताबाबत 27 सप्टेंबर 2021 पत्र*


https://youtu.be/J5mUPr6pJ3k

*महाराष्ट्रातील 4 ऑक्टो 21 पासून सुरक्षित शाळा सुरू करण्याबाबत सूचना 24 सप्टेंबर 21 जीआर*


*Subscribe*

*Like*

*Comments*

*Share*

Saturday, October 2, 2021

वर्णविचार



✔️* वर्ण :-


बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. 

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


✔️बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत  त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात. 


✔️मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.


👉*वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत. 


▪️१) स्वर

▪️२) स्वरादी 

▪️३) व्यंजने


👉  स्वर


🔸* स्वर :-


✔️१] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.

✔️२] या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात. 

✔️३] स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

✔️४] स्वर म्हणजे नुसता सुर.


🔹* स्वरांचे प्रकार-


▪️अ] उच्चारावरून पडणारे दोन प्रकार


✔️१) ऱ्हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात.

उदा. - अ, इ, उ, ऋ, ऌ 

   

✔️२) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.

उदा. - आ, ई, ऊ 


▪️ब] उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार


✔️१) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ 


✔️२) विजातीय स्वर :-भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ


👉 स्वरादी


▪️* स्वरादी :-


✔️१] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, 

त्यांना स्वरादी म्हणतात. 

उदा :-अं, अ: 


✔️२] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.


✔️३] यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.


✔️४] अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या  वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.

शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?

 


✳️ शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?

✳️ शालार्थ वेतन प्रणाली

➡️ प्रथमतः Google crome वर जाऊन शालार्थ वेबसाईट टाकावी.


➡️ युजर नेमच्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.


      उदाहरणार्थ:- 02DEDGKCM8403


➡️ पासवर्ड ifms123 टाका


➡️ नंतर captch टाकून Submit म्हणा.


➡️ यानंतर password reset करून घ्या.


➡️ Old password ifms123 टाका.


🔰 New password


🔰 Confirm password टाका.




➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने log in करा.


➡️ यानंतर Worklist मध्ये "Employee Corner" मध्ये"Employee Payslip" ऑप्शन वर क्लिक करा.


➡️ त्यानंतर 


▶️ Select month


▶️ Select year


▶️ व "View salary slip" ऑप्शन ला क्लिक करून.👇


salary slip "print or save" करू शकता.


सदरील पे स्लिप तुम्ही PDF रूपात मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता.

Saturday, July 24, 2021

११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म कसा भरावा?

 

 Exam Quality Management - World Class Education

आपण २०२१ मध्ये दहावी पास झाला आहात तर आपल्याला ११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म लिंक कोणती आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे.

महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक

CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर

CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१

दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८ /- रुपये भरावे लागणार आहे.

परीक्षा शुल्क

महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.

इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८/- रुपये भरावे लागणार आहे.

अर्ज कुठे भरावा

फॉर्म प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयीन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात. यानंतर, त्यांच्याकडे या साठी उपस्थित राहण्याचे किंवा न येण्याचे पर्याय त्यांच्याकडे असतील. त्यांना पाहिजे ते निवडू शकतात.


अर्ज येथे करा 👇

वेबसाईट

व्हिडीओ पाहण्यासाठी  👇 

 

Wednesday, June 23, 2021

शिष्यवृत्ती परीक्षा होणार



 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीची  शिष्यवृत्ती परीक्षा  ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठीची तयारी परिषदेकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे  यांनी  दिली. एप्रिल-मे या महिन्यांमध्ये होणारी ही पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने परीक्षा परिषदेकडून या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. 


जुलैमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन परिषदेकडून केले जात असून त्यासाठीची गोपनीय माहिती गोळा करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच शिक्षण अधिकारी आणि संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.



अधिक माहितीसाठी परिषदेच्या संकेतांक स भेट द्या

Monday, June 14, 2021

DD सह्याद्री वरील शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा


फोटो ला टच करा👇👇



दुसरी ते आठवीसाठी काय आहे हा ब्रीज कोर्स?

 


शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून राज्यातील शाळा बंद आहेत. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा साथीचा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे.

या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचं SCERT ने स्पष्ट केलं.

हा ब्रिज कोर्स नेमका कसा असेल? ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे का? त्याचे स्वरुप काय असणार आहे? शाळा सुरू करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरू केलीय का? अशा विविध प्रश्नांचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.


ब्रिज कोर्स कसा असेल?



15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

SCERT चे संचालक दिनकर टेमकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत."

• प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं.


• हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.


• यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.


• पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.

• ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे.

• ब्रिज कोर्सकडे केवळ एक कोर्स पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाहण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा असल्याचे एससीईआरटी मराठी विभाग प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.


• सुरुवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना आहेत. ब्रिज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही हे सुद्धा शिक्षकांना पहावे लागणार आहे.

• हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.


• मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे. SCERT यासंदर्भातील नियोजन करत असून प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळांकडून ब्रिज कोर्स अंतिम केला जाणार असल्याचे समजते.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मराठी भाषा विभागाच्या प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत आणि त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करत आहोत."

"पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांना आल्या पाहिजेत हा आमचा हेतू आहे." असं संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितलं.

ब्रिज कोर्सची आवश्यकता का आहे?

गेल्या वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचलेलं नाही. अनेक विद्यर्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपेक्षित आकलन झालेले नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे.


विद्यार्थ्यांचे जवळपास दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यास शाळांनी सुरू करू नये अशीही काही शिक्षकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर हा ब्रिज कोर्स तयार करण्यात येत असल्याचे समजते.

ब्रिज कोर्स संदर्भातील एका बैठकीत सहभागी झालेले शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास, तिसरीत विद्यार्थ्यांची गुणाकाराची संकल्पना स्पष्ट झाली नाही तर चौथीत भागाकार करण्यात त्यांना अडचणी येणार. एकूणच विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहणार. हे केवळ एका विषयाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असू शकते."

"शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी अभ्यासक्रम नव्हे तर विद्यार्थ्यांचे समुपदेशन त्यांचे मानसिक आरोग्य याचाही विचार व्हायला हवा." असंही त्यांनी सुचवलं.


'लर्निंग लॉस' म्हणजे नेमके काय?


राज्यातील अनेक शिक्षक ब्रिज कोर्ससाठी पूर्व तयारी करत असून यासंदर्भात शिक्षकांमध्येही मतेमतांतरे आहेत.

ब्रिज कोर्समध्ये केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर भर देण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, त्यांचे समुपदेशन अशा गोष्टींचीही दखल घेण्यात यावी असं मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.


लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले.


लॉकडॉऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या क्वेस्ट एज्यूकेशन संस्थेचे प्रमुख निलेश निमकर सांगतात, "दोन प्रकारचा लर्निंग लॉस असतो. पहिला म्हणजे यापूर्वी जे मुलांना येत होतं त्यातूनही मुलं थोडी मागे गेल्याचे दिसते. दुसरं म्हणजे यावर्षी जे शिकले असते तेवढे शिक्षणही त्यांच्यापर्यंत पोहचले नाही."

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात क्वेस्टा संस्थेने शंभरहून अधिक मुलांचे यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यानुसार, लॉकडॉऊनपूर्वी वाचून समजायचे अशी मुलंही आता यात मागे गेल्याचे दिसते.


ते सांगतात, "लॉकडॉऊन सुरू झालं तेव्हा मुलांना काहीतरी येत होतं. पण त्यातही मुलं मागे पडल्याचे दिसते. वर्षभर शिकली असती पण विद्यार्थ्यांना ती संधीही मिळाली नाही. ब्रिज कोर्सचा अर्थ हा मुलं कुठे आहेत तिथून शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी अभिव्यक्ती आणि बेसिक गणित याची चाचपणी करून तिथपासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे."

 

Wednesday, May 12, 2021

नवोदय विद्यालय घेणार नाही 15 मे रोजी पूर्वनियोजित सहावीची प्रवेश परीक्षा


नवोदय विद्यालय घेणार नाही 15 मे रोजी पूर्वनियोजित सहावीची प्रवेश परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा 15 मे 2021 च्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार नाही. मिझोराम, नागालॅंड आणि मेघालय वगळता देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्याच्या मध्यात होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीमध्ये प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेत असलेल्या नवोदय विद्यालय समितीने (NVS)ने navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार एनव्हीएस वर्ग सहावीची प्रवेश परीक्षा 2021 ही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.     

Visit site


परीक्षेच्या तारखेची घोषणा परीक्षेच्या तारखेच्या 15 दिवस आधी केली जाईल नवोदय विद्यालय समितीने एनव्हीएस वर्ग सहावीची प्रवेश 2021 चाचणी पुढे ढकलल्याने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली नाही. तथापि, विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याच्या उद्देशाने समितीने जाहीर केले, की वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा नवीन तारखेच्या किमान 15 दिवस आधी जाहीर केली जाईल.


Saturday, May 1, 2021

काराजनगी शाळेचा ऑनलाइन निकाल जाहीर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी यांच्या मार्फत....


💫 कोविड -१९ साथीच्या रोगाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता  विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल हा ऑनलाईन बघण्याची सुविधा दिनांक -: १ मे २०२१ वार -: शनिवार रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी खाली दिलेल्या विद्यार्थ्याच्या नावाला टच करून त्या संबंधित  निकाल विद्यार्थ्यांनी बघायचा आहे...

मुले 

नागेश मधुकर साळे 

सुशांत अनिल चौगुले 

दर्शन संतोष खिलारे 

 श्रवण विठ्ठल माने

     नवनाथ शामराव हक्के 

अमोल आनंदा माने

       सोहम गोरखनाथ माने 

 दऱ्याप्पा सुखदेव नरुटे

    संस्कार कृष्णा माने 

 संग्राम संतोष माने 

              अभिषेक रावसाहेब बिराजदार 

 विश्वजित विकास महाजन

  सुरज सुनील मोहिते  

  शुभम मधुकर भोसले

                                                अनिकेत भारत मोहिते                                    

        कृष्णराज संजय पवार

सुशांत सिद्धेश्वर चौगुले

मुली 

    दीक्षा अर्जुन संकपाळ  

 अंकिता अनिल माने

     निकिता भारत माने  

राजनंदिनी बिरुदेव बेडगे 

    श्रावणी पोपट झिंगे  

 शुभांगी शाम कदम

रचना रविंद्र मोहिते  

 शुभांगी संजय सावंत

कलावती महानिगाप्पा पुजारी



काही अडचण वाटल्यास अथवा शंका असल्यास संपर्क करा .


 वर्गशिक्षक   :    श्री. रियाज रजाक आतार 

                             ९९२२१४८७३२


(सूचना: हा अंतिम निकाल नसून यात तांत्रिक कारणाने त्रुटी असू शकतात. शाळा सुरु झाल्यावर आपणास प्रत्यक्ष गुणपत्रक देण्यात येतील.)

  सदर निकाल हा online अध्यापन ,स्वाध्याय , गृहभेटी  , यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर  दिलेला आहे 

                                       🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, April 13, 2021

15 एप्रिल ते 30 एप्रिल काय आहेत निर्बंध जाणून घ्या 👇

 उद्या 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून) 


पुढचे 15 दिवस 

काय आहे नियमावली जाणून घ्या


1. 144 लागू 

2. अनावश्यक येणे जाणे बंद

3. संचारबंदी असेल  

4. सकाळी 7 ते रात्री 8 5.अत्यावश्यक सुरू 

6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू

7. बँक सुरू राहतील 

8. पेट्रोल पंप सुरू राहतील

9. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील

10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू 

11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल) 

12. गरिबांना 3 किलो गहू 

आणि 

2 किलो तांदूळ 

मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल

13. शिवभोजन थाळी मोफत 2 महिने 

14. उपाशी कोणी राहणार नाही

15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार 

16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार) 

17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य

18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)

19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी) 

20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना त्यांनी कराव्यात .

Saturday, February 20, 2021

शेतजमिनीची मोजणी

 जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते?


अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.


त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.


आता आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं आणि सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.


मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे


शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.


या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


आता हा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.


"मोजणीसासाठी अर्ज" असं या अर्जाचं शीर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.


त्यानंतर पहिल्या पर्यायापुढे "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याविषयी माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.


त्यानंतर "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील" हा दुसरा पर्याय आहे. यातील मोजणीच्या प्रकारासमोर "मोजणीचा कालावधी" आणि "उद्देश" लिहायचा आहे. त्यापुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे.

तिसरा पर्याय आहे "सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम." यासमोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.


आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोजणीसाठी जी फी (शुल्क) आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.


जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.


एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क आकारलं जातं.


त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.


जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?


पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?


किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?


सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केले हे 11 बदल


"उद्देश" या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. जसं की शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.


त्यानंतर चौथ्या पर्यायात "सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक" म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.


त्यानंतर पाचव्या पर्यायात "लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता" लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.


सगळ्यात शेवटी सहाव्या पर्यायासमोर "अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन" दिलेलं आहे.


शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.


जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.


ही सगळी माहिती भरून झाली की कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.


एकदा का अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत फीड (दाखल) केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.


त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.


ई-मोजणी प्रणाली काय?


आता आपण जी प्रक्रिया पाहिली ती ऑफलाईन पद्धतीची आहे. यात शेतकऱ्याचा बराच वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीनं जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असं म्हटलं जातं. सध्या यासंबंधीचं सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे.


याविषयी सतीश भोसले (उपसंचालक, भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (भूमापन), पुणे) यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "जमीन मोजणीचा अर्ज करण्यापासून ते मोजणीची नक्कल (प्रत) डाऊनलोड होईपर्यंत सगळी प्रक्रिया शेतकऱ्याला घरी बसून करता यावी, यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी ई-मोजणी प्रणाली राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी स्वत: मोजणीचा अर्ज इंटरनेटवरून भरू शकतील. तसंच मोजणीची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आली, याचीही माहिती पाहू शकतील."